महाराष्ट्र ग्रामीण

Ladki Bahin Yojana: ‘त्या’ लाडक्या बहि‍णींना आता लाभ घेता येणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखेर स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. परंतु आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसताही लाभ घेतलेल्या महिलांकडून पैशांची वसुली करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

लाडकी बहीण योजनेतील कुठलेही नवीन निकष नाहीत. आम्ही स्वत:हून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीय. हे पैसे परत मागणार सुद्धा नाहीत. पण नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो बंद करण्यात येणार आहे. आम्ही जनतेच्या पैशांचे रक्षक आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही. काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वत:हून योजनेचा लाभ घेणे बंद केले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!