महाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे परिसरामध्ये वणव्यांच्या प्रमाणात वाढ

नागोठणे परिसरामध्ये वणव्यांच्या प्रमाणात वाढ
दिनेश ठमके
नागोठणे : जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सर्वच डोंगरांमध्ये वणव्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. वाकण, सुकेळी खिंड, खांब, भिसे खिंडीमधिल डोंगरांमध्ये वणव्यांचे प्रमाण वाढत चालले असुन याबाबतीत वनअधिकाऱ्यांसह शासकीय प्रशासनाचे याबाबतीत दुर्लक्ष व निष्काळजीपणा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याचे जाणवत आहे. त्यातच वातावरणातील या वाढत्या उष्णतेमध्येच जिल्ह्यातील अनेक डोंगरांमध्ये वणवे लावल्यामुळे या लावलेल्या वणव्यात जंगलामध्ये सगळीकडेच पाळा पाचोळा आणी सुकलेल्या झाडांचा खच पडलेला असल्यामुळे वा-याच्या प्रचंड वेगाने आग सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे या वणव्यात नैसर्गिक वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत असुन वन्य प्राण्यांना देखिल आपल्या जिवाला मुकावे लागत आहे. रोहा तालुक्यातील सुकेळी, खांब, भिसे खिंड, बाळसई परिसरामध्ये सर्वच डोंगर वणव्यांच्या भक्षस्थानी गेले आहेत. याच परिसरामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढण्याचे नक्की कारण काय? अशा प्रतिक्रिया नागरीकांमधुन उमटत आहेत.
याबाबतीत वनखात्याच्या वरीष्ठ अधिकारी वर्गाने गांभीर्याने लक्ष घालून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वणव्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी होत आहे.