महाराष्ट्र ग्रामीणराजकारण

देशातील महिलांसाठी पंतप्रधान मोदी साहेब परीस आहेत : आमदार चित्राताई वाघ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना घरोघरी पोहचविण्याचे महिलांना केले आवाहन 

देशातील महिलांसाठी पंतप्रधान मोदी साहेब परीस आहेत : आमदार चित्राताई वाघ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना घरोघरी पोहचविण्याचे महिलांना केले आवाहन 
महेश पवार 
नागोठणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आपण मेळाव्याला येऊ शकलात. सर्वांच्या घरातील इज्जत असलेली मुलगी, बहीण, आई, पत्नी पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या घरातील इज्जत मानली. मोदी साहेबांनी जेवढ्या योजना आणल्या त्यातील ३५ टक्के महत्वाकांक्षी  योजना या महिलांसाठी आहेत. आज जन्माला आलेली मुलगी ही लखपती असते. आत्तापर्यंत एवढे पंतप्रधान होऊन गेले त्यांना ही शक्य झाले नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी साहेब हे परीस आहेत असे गौरवशाली उद्गार भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष व विधानपरिषदेच्या आमदार चित्राताई वाघ यांनी काढले. विश्वरूप प्रतिष्ठानच्या राधिका गारमेंट्स मॅन्युफॅक्टरिंग युनिटच्या नागोठण्यातील केंद्राचे उद्घाटन चित्राताई वाघ यांच्या हस्ते भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे यांच्या निवासस्थानी संपन्न झाले त्यानंतर येथील टीएसके सभागृहात संपन्न झालेल्या भाजपाच्या दक्षिण रायगड जिल्हा महिला आघाडीच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
विश्वकर्मा योजनेतून महाराष्ट्रातून निवड होऊन दिल्ली येथील मेळाव्यात ३ दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या राधिका गारमेंट्स मॅन्युफॅक्टरिंग नागोठणे युनिटच्या प्रशिक्षक सुप्रिया ज्ञानेश्वर शिर्के, पेण येथील मच्छीमार महिलांच्या व्यवसाय करणाऱ्या जागेचा प्रश्न चुटकीसरशी सोडविणारे जिल्हा उपाध्यक्ष वैंकुठदादा पाटील, मेळाव्याच्या  आयोजनात प्रमुख भूमिका असलेले जिल्हा उपाध्यक्ष सोपनभाऊ जांबेकर यांचे यावेळी तोंड भरून कौतुक आ. चित्राताई वाघ यांनी केले.
विकसित भारताचा अमृतकाळ व सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्षे आणि भारतीय जनता पार्टी विकसित भारत संकल्प सभा या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या या महिला मेळाव्याला भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष व विधानपरिषद आमदार चित्राताई वाघ यांच्यासह भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष व राज्यसभेचे खासदार धैर्यशीलदादा पाटील, जिल्हा सरचिटणीस सतीश धारप, राजिपच्या माजी अध्यक्ष नीलिमाताई पाटील, राजिपच्या माजी सभापती चित्रा पाटील, विश्वरूप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रोहिणी सतीश धारप, भाजपा दक्षिण रायगड महिला आघाडीच्या डॉ. मंजुषा कुद्रीमोती, पेणच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, शर्मिला पाटील, हेमा मानकर, ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैंकुठशेठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, वैशाली मपारा, रोहा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर, तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, आनंद लाड, आलाप मेहता, ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत वाघ, अशोक अहिरे, कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिर्के, निखिल मढवी, संतोष लाड आदींसह विश्वरूप प्रतिष्ठानचे पदाधिकारी व भाजपाचे पदाधिकारी व दक्षिण रायगड जिल्ह्यातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विश्वरूप प्रतिष्ठान व राधिका गारमेंट्स मॅन्युफॅक्टरिंगचे तीन युनिट जिल्ह्यात सुरू केल्याबद्दल भाजपाच्या पदाधिकारी श्रेया कुंटे, डॉ. मंजुषा कुद्रीमोती, मीनल बुटाला, प्रियंका पिंपळे यांचे यावेळी चित्राताई वाघ यांनी कौतुक केले. विश्वरूप प्रतिष्ठानने प्रत्येक युनिटला १० मशीन दिल्याने महिलांना त्यांच्या सवडीनुसार युनिट मध्ये येऊन काम करता येणार आहे. त्यामुळे विश्वरूप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा  रोहिणीताई धारप यांच्यामुळे या महिला आपल्या पायावर उभ्या राहणार आहेत. पंतप्रधान मोदी साहेबांबरोबरच महायुतीचे सरकारही अनेक योजना राबवून चांगले काम करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवाभाऊ यांना आपल्या लाडक्या बहिणींना विविध व्यावसायिक योजनांमधून उद्योजिका बनवायचे आहे असे सांगून लाडकी बहीण योजनेवरोबरच महिलांसाठी सुरू केलेल्या अनेक योजनांची माहिती यावेळी चित्राताई वाघ यांनी दिली.
महिलांसाठी असलेल्या या योजना केवळ हिंदू धर्मीय महिलांसाठी नसून त्याचा लाभ मुस्लिम महिलाही मोठ्या प्रमाणात घेत आहेत. काँग्रेस व त्यांच्या चेल्यांनी मुस्लिम महिलांचे केवळ मतदान घेतले. पण मला मतदान मिळाले नाही तरी चालेल असे बोलून मुस्लिम भगिनींसाठी ट्रीपल तलाख विरोधात कायदा करून त्यांनाही संरक्षण देण्याचे काम मोदी साहेबांनी केले. भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष असल्याने यात कोण कधी काय होईल हे सांगता येत नसल्याने उपस्थित असलेल्या महिलांतूनही भविष्यात कुणी आमदार, खासदार होऊ शकते. त्यामुळे मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांच्या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामात झोकून द्या असेही चित्राताई वाघ यांनी सांगितले. 
खासदार धैर्यशीलदादा यांनी आपल्या मनोगतात मेळाव्याला असलेल्या महिलांची संख्या पाहता हा मेळावा ११० टक्के यशस्वी झाल्याचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या इतिहासात महिलांचे मोठे योगदान असल्याचे सांगून विश्वरूपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा चांगला प्रयत्न होत आहे. देशात पंतप्रधान मोदी साहेबांचे चांगले काम असल्याने त्यांच्या राष्ट्र उभारणीच्या कामात सर्वांनी साथ दिली पाहिजे असे आवाहन यावेळी खा. धैर्यशीलदादा पाटील यांनी उपस्थित महिलांना केले.
भाजपच्या या दक्षिण रायगड जिल्हा महिला  मेळाव्यात राजिपच्या माजी अध्यक्षा ॲड. नीलिमाताई पाटील, राजिपच्या माजी सभापती चित्रा पाटील,  पेणच्या माजी नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील, डॉ. मंजुषा कुद्रीमोती, हेमा मानकर, शर्मिला वैंकुठ पाटील, मीनल बुटाला यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीने आणलेल्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. या महिला मेळाव्याचे सूत्रसंचालन ॲड. पल्लवी तुळपुळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!